शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने शेतकºयांना देशोधडीला लावले : संजीवराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:14 IST

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर भाजप सरकार विरोधात बुधवारी येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाबाहेर आंदोलकांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेस फलटण शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात हल्लाबोल ...

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर भाजप सरकार विरोधात बुधवारी येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाबाहेर आंदोलकांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेस फलटण शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.‘राज्यात भाजप सरकारकडून फक्त आश्वासनाची खैरात सुरू असून, शेतकरी देशोधडीला लागलेला असून, आश्वासनाची नुसती खैरात भाजप सरकार करीत आहे. शेतकºयांना कर्जमाफीच्या नावाखाली झुलवून ठेवण्यात आले आहे.संपूर्ण कर्जमाफी न करता शेतकºयांना नियम व अटी एवढ्या लावलेत की, कोणालाही या कर्जमाफीचा फायदा होत नाही. फडणवीस सरकारने शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केला. जनतेच्या आणि शेतकºयांच्या प्रश्नावर सरकार काहीच काम करीत नसल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.‘शेतकºयांना नवीन कृषिपंपचे वीज कनेक्शन देणे गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारला जमले नसून भरमसाठ लाईट बिलामुळे जनता अडचणीत आली आहे, असा आरोप आमदार दीपक चव्हाण यांनी केला. राज्याला कर्जाच्या खाईत लोटणाºया भाजप सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून यापुढेही सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘भाजप सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून वीज, आरोग्य, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा देणे त्यांना जमलेले नाही. शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असून, भाजप सरकारने राजीनामा देण्याची मागणी सुभाष शिंदे यांनी केली.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.या मोर्चात नगराध्यक्षा नीता नेवसे, सभापती रेश्मा भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलावडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, भीमदेव बुरुंगले व सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.कमी कार्यकर्ते आल्याने आंदोलन दोन तास उशिरा..या हल्लाबोल मोर्चाचे बुधवारी सकाळी नऊ वाजता आयोजन करण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कमी कार्यकर्त्यांमुळे दीड तास उशिरा झाले. तालुक्यात सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात असूनही कार्यकर्ते कमी आल्याने भाषणात संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि सुभाष शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Strikeसंप